Jump to content

जवाहरलाल नेहरू बंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Image
जवाहरलाल नेहरू बंदर

जवाहरलाल नेहरू बंदर(जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे एन पी टी)) किंवा न्हावा शेवा हे आधुनिक सुविधा असलेले बंदर मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या खाडीवर भारतातील सगळ्यात मोठे कंटेनर-बंदर आहे. हे न्हावा आणि शेवा या बेटांवर सन १९८९मध्ये बांधून पूर्ण झाले. मुंबई बंदराद्वारे होणारी मालवाहतूक कमी करण्यासाठी हे बांधण्यात आले. २०१४-१५ साली न्हावा शेवा बंदरातून ४४ लाख ७० हजार कंटेनर्सची ने-आण झाली.

न्हावा शेवा हे बंदर जगातील प्रमुख ३५ कंटेनर बंदरापैकी एक आहे. हा पोर्ट नॅशनल हायवे ३४८ द्वारे रस्ते मार्गे तर पनवेल-न्हावा शेवा रेल्वे लाईन ने जोडला आहे. हा भारतातील कंटेनर हाताळणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे हे बंदर उरण तालुक्यातील न्हावा शेवा या गावामध्ये वसवलेला आहे, जे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात व नवी मुंबईत येते. अनेक कंपन्यांचे वीअर हाऊस आहेत व जेएनपीटी टाऊनशिप येथे आहेत.